Menu
Log in


Log in


डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या कविता

<< First  < Prev   1   2   Next >  Last >> 
  • 21 Mar 2022 6:44 AM | Amol Sawarkar (Administrator)

    दऱ्या खोरे

    जळत होते

    पडत होते

    काळे

    सुरू होते

    अग्निहोत्र

    पसरत होते

    जाळे

    ओढली जात होती

    माणसे,स्फोटके अंगाला

    बांधून

    फोडली जात होती

    निष्पापांची फौज

    करून माणसे

    त्यात ओढली

    जात होती

    तेंव्हा कुठे

    गेला होता

    सत्तासुता

    तुझा धर्म

    एवढे कुकर्म तर

    डोळ्यांवर

    कातडे ओढून तू

    निमूट बघत होतास

    हसत होतास

    कुत्सितपणे त्यांना

    सत्ताधर्मच फक्त

    निभवीत होतास

    द्रौपदी नागवली जाणे

    राजसभेत

    हा तर युद्धाचाच

    भाग म्हणत होतास

    सत्तेच्या प्रेमात आणि

    सत्तेसाठी युद्धात

    सारे काही म्हणत होतास

    क्षम्य

    माणसा, तुझ्यातला उफाळून येणे

    द्वेषच तेवढा,हवा तेंव्हा,

    वाटत नाही का

    तुला गुन्हा अक्षम्य?

    ---श्रीपाद भालचंद्र जोशी


  • 12 Mar 2022 12:21 AM | Anonymous

    नमो गंगे,

    नमो नमः

    होती,आहे,

    तशीच रहा

    कोणी म्हणाले होते

    तू हळवी आहेस,

    मळली आहेस,पापं

    धुवून,धुवून पाप्यांची

    गंगे,

    महान आहेस तू

    अक्क्लच

    कमी आहे बाप्यांची

    अशीच वहात रहा

    खळाळत,अशाच

    वाहून नेत रहा,

    साऱ्यांच्याच साऱ्या स्मृती

    वाल्यांचे करत रहा वाल्मिकी

    आम्हाला पावन तर करून घेतच रहा

    कमी कशी होतील पापे आमची

    हे देखील थोडे पहात रहा

    तू,माता,तू भगिनी,

    तुझ्या वाहत्या रूपातील

    कधी मनमोहिनी,

    सुखकारी,प्रलयंकारी कधी

    तुझ्या विशाल पात्राच्या,

    दोन्ही काठांवर

    पाय घासत येणाऱ्यांनाही

    तू थोडी पावणार कधी?

    ---श्रीपाद भालचंद्र जोशी


<< First  < Prev   1   2   Next >  Last >>